Sunday, March 27, 2011

क्षण जे उरले काही............


जळुन गेली काया
ओठांवर उरली माया
तो उगा हासतो का?
ही कसली संध्याछाया ?.

ओढुन घेता चादर
जो फुटला नाही पाझर
त्यास प्रेम म्हणावे का?
जो आटुन गेला सागर

ज्या अस्तीत्वच नाही
क्षण जे उरले काही
मी त्यास आठवणी म्हणत
जगणे फुलवीत राही.

-अनिल बिहाणी.

No comments: