आयुष्याच्या उजाड भिंतीवर
लिहलेल्या दोन कविता
जाता जाता सहजच
वाचाव्या कुणीतरी
अन् नकळत उमलाव्या
ओठांच्या पाकळ्या दाद देण्यासाठी
नाहीतर मग
चालता चालता मारुन जावं
एक अश्वासक थाप पाठीवर
जमलंच नाही तेही तर
करित कौतुकमिश्रीत स्मितहास्य
जावं पुढे निघुन
अन् आलेच कधी आयुष्यात
उजाड करणारे काही प्रसंग
तर आठवाव्या माझ्या दोन कविता
आणि गुणगुणत सहजच त्या
लिहाव्या आपणही आपल्या आयुश्याच्या
उजाड भिंतीवर दोन कविता
मागुन येणा-यांसाठी .
-अनिल बिहाणी.
Wednesday, July 30, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment