Tuesday, June 24, 2008

'ती'ची खंत

रस्त्याच्या कडेला गिर्हाइकाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या तीलाही
होतं कधी काळी माणसाचं मन
जे गाडलं गेलं होतं
कित्येक वासनांधांच्या वासनेच्या ढीगाखाली

रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या कित्येक
तथाकथीत नैतिकांच्या तुच्छ नजरा
पुन्हा पुन्हा जाळत होत्या
तिचं ते गडलं गेलेलं माणसाचं मन


कदाचीत त्यानां माहीतच नसावं
तिनेही कधी पाहिला होता स्वप्नात राजकुमार
अन् मनोमन ठरवुनही टाकलं होतं त्याच्याशी एकनिष्ट रहान्याचं
आपलं सर्वस्व त्याला वाहात


परीस्थीतीने हतबल झालेल्या तिला
खंत नव्हती स्वप्न भंगन्याची
पण खंत होती
या जाणाऱ्या येणाऱ्या कित्येकांना
आई बहीणी आपल्यामुळे सुरक्षीत असल्याची जाणीव नसण्याची

1 comment:

Unknown said...

TU LA MAHITI AAHE ANIL TU KHUP CHAN LIHITOS .
TAR MAZI COMMENT AASHI KI KONI HYA VISHYAS SHASA HAT LAVAT NAHI,AANI BARECH LOKANNA TE AAVDAT HI NA.ASO............
PAN KHARCH SHAHARA AANNARI KAVITA TU AATA REKHATLI AAHE.
TASECH TYA MULICHYA AATHVA STRICHYA MANAT AASLELI BHITI KIVVA EK KUTHETARI JANIV TU ITKI SOPYA SWARUPAT MANDALI AAHES KI MI KHUP BHARAUN GELO RE.......
SANGU NAHI SHAKAT........CHAL AASECH KAHISE JAGALA AANI HO AAMHALA DAKHAV KI"RAKHNE KE LIYE TO BHI AAPNA KHAYAL RAKHTE HAI,YE KAUN JANTA HAI KI KUCH LOG TO AAISE BHI HOTE HAI JO DUSRON KA BHI KHAYAL RAKHTE HAI"