Friday, May 22, 2009

ज्ञानेश्वर

सुख कुणाचे दुःख कुणाचे
राग कुणाचा लोभ कुणाचा
हे तर सारे आपुले माझे
मी कुणाचा ?मी कुणाचा?

मागतो मी पसायदान जे
माझ्यासाठी कधीच नव्हते
हे तर सारे तुमचे तुम्हा
मी कुणाचा? मी कुणाचा ?

अभंग अजुनही गाते मुक्ता
दार कशास उघडावे मी ?
आसवास हे पाणी म्हणती
मी कुणाचा ?मी कुणाचा?


-अनिल बिहाणी .






भेसुरता?

मनाच्या नाजुक अंगावर
थयथय नाचून गेलेल्या
काळच्या जखमा आजही
अगदी तशाच ओल्या
उठते आजही एखादी
जीवघेणी कळ
तिच्यावर पडलेल्या एखाद्या
खारट खारट शब्दाने
अधुनमधुन उठनार्या या वेदनेवर
कणभरही समजुतींची हळद पडू नये
हा योगायोग की
अशाच वेदनांनी पछाड़लेल्या
समाज मनाची भेसुरता?


-अनिल बिहाणी.